हिंगणघाट ( प्रतिनिधी): सचिन हाडके
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सध्या 'रेती माफियांचा' नंगा नाच सुरू असून, प्रशासनाच्या नाकाखाली नदीपात्राची छाती फाडली जात आहे. या गंभीर प्रकारावर हिंगणघाटचे खंबीर नेतृत्व अश्विन तावाडे यांनी आता रणशिंग फुंकले आहे. "अवैध रेती उपसा तात्काळ थांबवा, अशा शब्दांत त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना ठणकावून सांगितले आहे.
💥 पोकलॅण्डचा'पाशवी' उपसा; गावांची तहान धोक्यात!
नदीपात्रात नियम धाब्यावर बसवून रात्रंदिवस JCB आणि पोकलॅण्डच्या साहाय्याने उत्खनन सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा तर ऱ्हास होतच आहे, पण परिसरातील गावांत पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. "नदीपात्र की मृत्यूचे सापळे?" असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. सुसाट वेगाने धावणाऱ्या रेती ट्रॅक्टर मुळे सामान्यांचा जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
🚨 "मंत्रालयापर्यंत गाजलेलं हत्याकांड विसरलात काय?"
रेती घाटावर झालेलं अलीकडचं हत्याकांड राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत चांगलंच गाजलं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असतानाही प्रशासन सुस्त का? असा जळजळीत सवाल तावाडे यांनी उपस्थित केला आहे. महसूल आणि पोलीस विभागाचे काही कर्मचारी रेती माफियांशी हातमिळवणी करून बसले आहेत का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
🔥 अश्विन तावाडे यांच्या 'हाय-टेक' मागण्या:
- लाईव्ह प्रक्षेपण करा: केवळ CCTV लावून चालणार नाही, तर त्याचं 'लाईव्ह' फीड थेट तहसील कार्यालयात असावं, जेणेकरून कोणाची चोरी लपणार नाही!
- सूर्यास्त म्हणजे बंदी: रात्रीच्या अंधारात चालणारी 'काली कमाई' रोखण्यासाठी सूर्यास्तानंतर काम पूर्णपणे बंद करा.
- कठोर बंदोबस्त: प्रत्येक घाटावर महसूल आणि पोलीस कर्मचारी तैनात ठेवा, जेणेकरून माफियांची हिंमत होणार नाही.
⚠️ शेवटचा इशारा: "आता थेट मैदानात उतरणार!"
अश्विन तावाडे यांनी प्रशासनाला केवळ १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. "जर या काळात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आम्ही केवळ आंदोलन करणार नाही, तर रेती माफिया आणि त्यांना सामील असलेल्या अधिकाऱ्यांचे 'स्ट्रिंग ऑपरेशन' करून त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर उघड करू," असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला आहे.
हिंगणघाटच्या अस्मितेसाठी आणि पर्यावरणासाठी अश्विन तावाडे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या