Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

राज ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य; माघार नाहीच!

 



मनसे उमेदवार साईनाथ धुळे यांचा अफवांना चोख प्रत्युत्तर

नागोठणे (प्रतिनिधी: अमोल जाधव):

नागोठणे जिल्हा परिषद गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार साईनाथ धुळे यांच्या उमेदवारीबाबत पसरवल्या जाणाऱ्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. "साहेब जो आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही," अशा शब्दांत धुळे यांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • निष्ठेची ग्वाही: पक्ष स्थापनेपासून प्रामाणिकपणे काम करत असून, राज साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी कधीही करणार नाही.
  • एबी फॉर्मवर विश्वास: पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
  • विजयाचा निर्धार: येत्या ६ फेब्रुवारीला नागोठणे जिल्हा परिषद गटात मनसेचा झेंडा फडकेल आणि आम्ही जल्लोष करू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • "अफवांकडे दुर्लक्ष करा. आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत आणि राज साहेबांच्या विचाराने ही लढाई जिंकणारच!"

    साईनाथ धुळे (रोहा तालुका अध्यक्ष व मनसे उमेदवार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या