Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

आ. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाटात रक्तदान शिबिर; ५१ युवकांचे रक्तदान

 



गुणवंत विद्यार्थिनींचा ‘संविधान उद्देशिका’ देऊन गौरव

हिंगणघाट (प्रतिनिधी): सचिन हाडके 

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रहार सोशल वेलफेअर फाउंडेशन व प्रहार संघटनेच्या वतीने हिंगणघाट येथे भव्य रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक स्नेहदीप कॉन्व्हेंटच्या प्रांगणात पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमात तब्बल ५१ युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

मान्यवरांची उपस्थिती

​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सतीश वखरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मेश कोठारी, स्नेहदीप संस्थेचे अध्यक्ष संदीप सरोदे, नगरसेवक विक्की वाघमारे, नितेश नवरखेडे, नयन निखाडे, रोहित हांडे, प्रशांत लोणकर व डॉ. आशिष मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.

'वर्षातून दोनदा रक्तदान करा'

​यावेळी मार्गदर्शन करताना हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मेश कोठारी यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

​"रक्ताची एक बाटली (युनिट) एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचवू शकते. निरोगी नागरिकांनी वर्षातून किमान दोनदा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी," असे आवाहन त्यांनी केले.


​कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सूरज कुबडे यांनी प्रास्ताविकातून आपल्या भावना व्यक्त केल्या. आ. बच्चू कडू यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण समाजसेवेचा वसा घेतला असून, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार



​याप्रसंगी नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. श्रुतिका देविदास महाबुधे, कु. धार्मिका केशव देवतळे आणि कु. राशी प्रदीप वरघणे या तिघींना शाल आणि भारतीय संविधानाची उद्देशिका (प्रस्तावना) देऊन गौरविण्यात आले.

सेवाग्राम हॉस्पिटलच्या टीमचे सहकार्य

​रक्तदान मोहीम यशस्वी करण्यासाठी सेवाग्राम हॉस्पिटलच्या रक्तपेढी चमूने विशेष परिश्रम घेतले. डॉ. आशिष मसराम यांच्या नेतृत्वात डॉ. रिज्जू, मनीष अंबुलकर, प्रीतम ताकसांडे, जयंत गोडघाटे आणि चंदू जिंदे यांनी रक्त संकलनाची प्रक्रिया पार पाडली.

सुत्रसंचालन व आभार:

कार्यक्रमाचे सुबक संचालन गोपाल मांडवकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिनेश नरड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम:

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत सातपुते, पवन वाघमारे, लोकेश निशाने, गणेश मांडवकर, लोकेश मांडवकर, रितेश दडमल, दर्शन धानोरकर, ऋषिकेश धानोरकर, अमोल वाघमारे, साई चिंचूलकर, देवा चौधरी, शैलेश शेंडे आदी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी व युवकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या